डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता !
विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दीन. महापरिनिर्वाणदिनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! जागतिक कीर्तीचे विचारवंत अशी ओळख आलेल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. आधुनिक भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारे विचारवंत म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जगभर ओळख आहे मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ज्या जाहिराती किंवा शुभेच्छा संदेश दिल्या जातात त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ओळख दलितांचे उद्धारक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशीच करून दिली जाते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दलीत उद्धाराचे कार्य तर जगजाहीर आहे. जगाला हेवा वाटेल अशी राज्यघटना त्यांनी देशाला दिली. त्यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच विविध जाती, धर्म, पंथ, भाषा, संस्कृती असलेला आपला देश एकसंघपणे बांधला गेला आहे. भारतासारखी राज्यघटना नसल्याने भारताच्या शेजारी असलेल्या देशांची आज काय अवस्था झाली आहे हे आपण पाहतोच आहे. त्यामुळे त्यांची दलीत उद्धारक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ही ओळख यथायोग्यच असली तरी त्यांचे कार्य केवळ एवढ्या पुरतेच मर्यादित नाही. थोर अर्थतज्ज्ञ, महिलांचे उद्धारक, कृषी तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, जलतज्ज्ञ इतिहास तज्ज्ञ, समाज शास्त्रज्ञ, कायदेपंडित, धर्म चिकित्सक, राजनीती तज्ज्ञ, कामगार नेते, शांतीचे उपासक, कलाप्रेमी, लेखक, पत्रकार असे विविध पैलू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विविध पैलू कायम दुर्लक्षित केले जातात म्हणूनच मी माझ्या महिलांचे उद्धारक डॉ बाबासाहेब आंबेडकर व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जलविषक धोरण या मागील दोन लेखात डॉ बाबसाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी केलेले कार्य आणि जलतज्ज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन पैलूंची ओळख करून दिली होती आज मी डॉ बाबसाहेब आंबेडकरांची पत्रकार म्हणून असलेल्या पैलूंची ओळख करून देणार आहे.
डॉ बाबसाहेब आंबेडकरांचा पत्रकारितेचा प्रवास मूकनायक पासून सुरू झाला. नंतर हा प्रवास बहिष्कृत भारत, जनता व प्रबुद्ध भारत पर्यंत सुरूच राहिला. सामाजिक आणि राजकीय ध्येयासाठी स्वतःचे वर्तमानपत्र असावे असे डॉ बाबसाहेब आंबेडकरांना वाटले म्हणूनच त्यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. दलितांवर होणाऱ्या अन्याय,अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम मूकनायक पाक्षिकानं निष्ठेनं केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते. सुरुवातीला पांडुरंग नंदराम भटकर पाक्षिकाचे संपादक होते. त्यानंतर मूकनायकाच्या व्यवस्थापकपदी असणारे ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे संपादक पदाची जबाबदारी आली. मूकनायक या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे, ही जाणीव निर्माण केली. ‘मूकनायक’ पत्रात विविध विचार, वर्तमानसार, निवडक पत्रातील उतारे, क्षेम, समाचार, कुशल प्रश्न, शेला पागोटे ही सदरे होती. ‘मूकनायक’ एप्रिल १९२३ मधे बंद पडले.
इ.स. १९२४ मध्ये डॉ बाबसाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. ३ एप्रिल १९२४ रोजी बहिष्कृत भारत पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी समता हे वृत्तपत्र सुरू केले. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. २४ फेब्रुवारी १९३० रोजी त्यांनी जनता तर ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९४४ मध्ये बाबासाहेबांनी “आम्ही शासनकर्ती जमात बनणार” या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची लेखनी झुंजार, क्रांतिकारी आणि प्रभावी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली की त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समजू शकत होती.
गंगाधर पानतावणे यांनी आपल्या ग्रंथात म्हटले आहे की, “या मुकनायकाने बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. बाबासाहेब महान पत्रकार होते.”
पत्रकार महामानव डॉ बाबसाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे


ज्या ठिकाणी जायला १५ मिनिटे लागतात त्या ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे ३५ मिनिटे लागतात. मुंबई हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शहर असले तरी वाहतूक कोंडीचे शहर अशी मुंबईची नवी ओळख निर्माण होत आहे. वाढत्या वाहन संख्येसोबतच रस्त्यांवर कुठेही पार्क केलेली तसेच छोट्या रस्त्यांवर दुतर्फा पार्क केलेली वाहने कोंडीचे मोठे कारण ठरत आहे. जी मुंबईची अवस्था आहे जवळपास तशीच अवस्था राज्यातील अन्य मोठ्या शहरांची आहे. मुंबईसह राज्यातील इतर मोठ्या शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अधिकाधिक वाहन तळांची आवश्यकता आहे. सरकारने त्या दृष्टीने पावले उचलायला हवीत. वाढत्या वाहनांमुळे मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यावर्षी मुंबईतील हवा सर्वाधिक निकृष्ट श्रेणीत गणली गेली आहे. दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा अधिक दूषित असल्याचा एक अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केला आहे.
मुंबईतील हवा प्रदूषित असण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे मुंबईतील वाढती वाहनांची संख्या. जर वाहनांच्या संख्येत अशीच वाढ होऊ लागली तर मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे ती प्रदूषणाचीही राजधानी बनेल आणि लोकांना श्वास घेणे मुश्किल होईल. त्यामुळेच वाढत्या वाहनांना आळा घालणे आवश्यक आहे. जर मुंबईसह राज्यातील इतर शहरांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीतजास्त वापर केला तर ही समस्या सुटण्यास मदत होईल. सरकारनेही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी. जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली तर लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाच वापर करतील त्यामुळे वाढत्या वाहनांना आळा बसेल. वाहनाची संख्या कमी झाली की इंधन बचतही होईल आणि प्रदूषणालाही अटकाव होईल तसेच पार्किंगचा प्रश्नही सुटेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणे ही काळाची गरज आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली की वाढत्या वाहनांना आपोआप आळा बसेल.
सविस्तर बातमी अशी की, मंगळवारी २ डिसेंबर रोजी गोदावरी नदी पात्रात दुपारच्या सुमारास ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळुची अवैध वाहतूक चालु असल्याची माहीती मिळाली त्याच माहीतीच्या आधारे मंगळवारी दुपारच्या वेळेस मोटारसायकलवरून जात गुंज नदीपात्रात धडक कारवाई करून अवैध वाळू वाहतूक करणारा जॉनडीअर कंपनीचा हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर पकडला. साप्ताहिक स्मृतिगंध वृत्तपत्रात प्रकाशित बातमीच्या दनक्याने महसुल प्रशासन सक्रिय झाले आणि यशस्वी कारवाई केली. सदरील ट्रॅक्टर सध्या पुढील महसुली कारवाईसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला आहे.








शाळेच्या विद्यार्थ्यांनी परिसरात भव्य संविधान गौरव प्रभात फेरी काढली . तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व सांगणारे उत्कृष्ट असे चित्र, संविधान गीते, संविधानावर आधारित नाटिका, पथनाट्य ,प्रश्न – उत्तर, ,असे विविध उत्कृष्ट सादरीकरण विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमास सय्यद अझहर सिकंदर सय्यद अजहर अहमद, शेख खमरोद्दीन,श्रीमती सय्यदा निशात, शेख मेहराज, पठाण मोईज खान, मोहम्मद कलीमैद्दीन, श्रीमती शेख दस्तगीरजहा, शेख अयाज अहमद, श्रीमती निखत फातेमा, श्रीमती अन्सारी परवीन, सय्यद हम्मीद्दीन, सय्यद वहाज, शेख अब्दुल अजीज, शेख सादिक, शेख आखिब जावेद, अब्दुल हासिब, सय्यद मुस्दीख यांच्यासह विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.