बीड: जिल्हयातील माजलगाव आणि परळी तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रातून सध्या महसूल आणि पर्यावरण विभागाच्या सर्व अटी-शर्ती धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पत्रकार लक्ष्मण उजगरे व विशाल डोंगरे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे पुराव्यासह तक्रार करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मशिन्सचा वापर अन् नियमांचे उल्लंघन

मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील आडोळा, गंगामसला आणि परळी तालुक्यातील तेलसमुख येथे अधिकृत वाळू धक्क्यांच्या नावाखाली हा काळा बाजार सुरू आहे. वास्तविक, वाळू उपसा करताना मशिन्सचा वापर करण्यास मनाई असतानाही, या ठिकाणी ‘टू-टेन’ (210), जेसीबी आणि क्रेन यांसारख्या अत्याधुनिक मशिन्सचा वापर करून दिवस-रात्र नदीचे पात्र ओरबडले जात आहे. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून नदीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.
कोऱ्या पावतीचा ‘नवा’ गोरखधंदा
या अवैध उपशात वाहतुकीसाठी देखील अनोखी शक्कल लढवली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा आणि टीप्पर चालकांना एकच इन्व्हॉइस (Invoice) जनरेट करून दिले जाते. धक्कादायक बाब म्हणजे, चालकांकडे एक कोरी पावती दिली जाते, ज्यावर ना तारीख असते, ना वेळ, ना ठिकाण. जर वाटेत कुठे तपासणी झाली, तर त्याच वेळी त्यावर माहिती भरून प्रशासनाची दिशाभूल केली जाते. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी
या सर्व प्रकाराची गांभीर्याने दखल घेत पत्रकार लक्ष्मण उजगरे व विशाल डोंगरे यांनी २५ फेब्रुवारी रोजी बीडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी गोदावरी पात्रातील या अवैध उपशाचे पुरावे सादर केले असून, संबंधित वाळू घाटांवर तात्काळ धाडी टाकून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता प्रशासन या ‘वाळू माफियांच्या’ मुसक्या आवळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पात्रात पाणी असताना वाळू घाटांचा ताबा दिलाच कसा? तहसील प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने गोदावरी नदीपात्र अद्यापही पाण्याने तुडुंब भरलेले आहे. नियमानुसार नदीपात्रात पाणी असताना वाळू उपसा करणे किंवा घाटांचा ताबा देणे पर्यावरण नियमांच्या विरोधात आहे. मात्र, असे असतानाही तहसील प्रशासनाने संबंधित वाळू घाटांचा ताबा नेमका दिलाच कसा, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने गोदावरीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे. पर्यावरण विभागाच्या नियमांनुसार, नदीपात्रात पाणी असल्यास वाळू उत्खननास परवानगी देता येत नाही. असे केल्यास नदीच्या नैसर्गिक प्रवासाला बाधा पोहोचते आणि पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. मात्र, या सर्व नियमांना धाब्यावर बसवून काही घाटांचा ताबा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर संशय
पाणी असताना घाटांचा ताबा देणे ही बाब गंभीर असून, यात तहसील प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत आहे. नेमक्या कोणत्या आधारे आणि कोणाच्या दबावाखाली हा ताबा देण्यात आला, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. जर नियम धाब्यावर बसवून हे व्यवहार झाले असतील, तर संबंधित अधिकार्यांवरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी असलेले नियम केवळ कागदावरच राहणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
गोदावरी पात्रातील वाढती पाण्याची पातळी पाहता, तातडीने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर पाऊले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा, वाळू उपशाच्या नावाखाली नदीपात्राचे आणि पर्यावरणाचे न भरून निघणारे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
















हे विसरून चालणार नाही.त्या या पदावर असलेल्या पहिल्या महिला आहेत. यापूर्वी, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्या म्हणून महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सदस्या होत्या. बारामती टेक्सटाईल कंपनीच्या अध्यक्षा आणि एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या सीईओ आहेत. २०२४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत बारामती येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या मात्र, त्यांचा पराभव झाला.त्यांच्या नणंद सुप्रिया सुळे यांच्याकडून १.५८ लाख मतांनी पराभूत झाल्या.हा जिव्हारी लागणारा पराभव आणि बहिणीचा विजय यात अजित पवार कधी गंभीर झाले नाहीत.राजकारण ते त्याच वेळी संपवत आणि कामाला सुरुवात करत असतं.आज त्यांची सहचारिणी राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री झालीय. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या मराठवाड्यातील आहेत . त्यामुळे अजित पवार मराठवाड्याचे जावई . सुनेत्रा यांचा जन्म उस्मानाबाद येथील तेर येथे बाजीराव पाटील यांच्या पोटी झाला. त्या माजी राज्यमंत्री आणि लोकसभा खासदार पद्मसिंह पाटील यांच्या बहिणी आहेत.राजकारणातील मोठं प्रस्थ पद्मसिंह पाटील यांच्याभोवती होतं.२०१० मध्ये, सुनेत्रा यांनी पर्यावरणीय मंच ऑफ इंडियाची स्थापना केली, जी सेंद्रिय शेती, इको-व्हिलेजेस आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित एक स्वयंसेवी संस्था आहे. पर्यावरण जागरूकता पसरवण्यासाठी आणि शाश्वत पद्धती लागू करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना “ग्रीन वॉरियर अवॉर्ड” आणि इतर प्रशंसा मिळाली आहे. २०११ पासून त्या फ्रान्समधील जागतिक उद्योजकता मंचाच्या थिंक टँक सदस्य आहेत, शाश्वत विकास आणि उद्योजकतेवरील जागतिक चर्चांमध्ये योगदान देतात. सुनेत्रा पवार या शरद पवार यांनी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त म्हणून देखील काम करतात. त्या नियमितपणे तिच्या उपक्रमांवर देखरेख करतात, २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची तरतूद सुनिश्चित करतात. शिक्षणातील त्यांचा सहभाग २०१७ पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून त्यानी काम पाहिले आहे. महिलांना संधी मिळायला हवी . तीचं सोनं केल्याशिवाय त्या राहत नाहीत हा आजवरचा इतिहास सांगतो.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पक्षाची आणि मुख्यमंत्री पदाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळत आहेत. बहुजन समाज पक्षाला उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती सांभाळत आहेत. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी याच्या निधनानंतर सोनिया गांधी यांनी पक्ष सांभाळला.अशी अनेक उदाहरणे देता येतील. महिलांनी फक्त घर सांभाळावे तिला जमेल का? दुसऱ्याच्या हातचं बाहूल होतील असे प्रश्न करण्यापेक्षा महिलांना संधी किती दिली जाते?याचा विचार मात्र आपण कधी केला आहे का? सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्या जाण्याने त्यांना पक्षाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी लागते. मात्र, अजित पवार यांच्या कामाचा झपाटा विलक्षण होता ते सुनेत्रा पवार यांनी जवळून पाहिला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आणि पक्षाच्या सर्वेसर्वा म्हणून आदर्श निर्माण करतील यात संदेह नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आपल्या कार्यातून अजित पवारांना स्वर्गीय नव्हे तर अजित ठेवतील. अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!