Home Blog

गोदावरी पात्रात नियमांची पायमल्ली; माजलगाव आणि परळीत वाळूचा अवैध उपसा जोमात; कोऱ्या पावतीचा ‘नवा’ गोरखधंदा

 

बीड: जिल्हयातील माजलगाव आणि परळी तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रातून सध्या महसूल आणि पर्यावरण विभागाच्या सर्व अटी-शर्ती धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पत्रकार लक्ष्मण उजगरे व विशाल डोंगरे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे पुराव्यासह तक्रार करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मशिन्सचा वापर अन् नियमांचे उल्लंघन

Oplus_131072

मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील आडोळा, गंगामसला आणि परळी तालुक्यातील तेलसमुख येथे अधिकृत वाळू धक्क्यांच्या नावाखाली हा काळा बाजार सुरू आहे. वास्तविक, वाळू उपसा करताना मशिन्सचा वापर करण्यास मनाई असतानाही, या ठिकाणी ‘टू-टेन’ (210), जेसीबी आणि क्रेन यांसारख्या अत्याधुनिक मशिन्सचा वापर करून दिवस-रात्र नदीचे पात्र ओरबडले जात आहे. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून नदीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

कोऱ्या पावतीचा ‘नवा’ गोरखधंदा

या अवैध उपशात वाहतुकीसाठी देखील अनोखी शक्कल लढवली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा आणि टीप्पर चालकांना एकच इन्व्हॉइस (Invoice) जनरेट करून दिले जाते. धक्कादायक बाब म्हणजे, चालकांकडे एक कोरी पावती दिली जाते, ज्यावर ना तारीख असते, ना वेळ, ना ठिकाण. जर वाटेत कुठे तपासणी झाली, तर त्याच वेळी त्यावर माहिती भरून प्रशासनाची दिशाभूल केली जाते. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

Oplus_131072

जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

या सर्व प्रकाराची गांभीर्याने दखल घेत पत्रकार लक्ष्मण उजगरे व विशाल डोंगरे यांनी २५ फेब्रुवारी रोजी बीडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी गोदावरी पात्रातील या अवैध उपशाचे पुरावे सादर केले असून, संबंधित वाळू घाटांवर तात्काळ धाडी टाकून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता प्रशासन या ‘वाळू माफियांच्या’ मुसक्या आवळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

पात्रात पाणी असताना वाळू घाटांचा ताबा दिलाच कसा? तहसील प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

Oplus_131072

यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने गोदावरी नदीपात्र अद्यापही पाण्याने तुडुंब भरलेले आहे. नियमानुसार नदीपात्रात पाणी असताना वाळू उपसा करणे किंवा घाटांचा ताबा देणे पर्यावरण नियमांच्या विरोधात आहे. मात्र, असे असतानाही तहसील प्रशासनाने संबंधित वाळू घाटांचा ताबा नेमका दिलाच कसा, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने गोदावरीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे. पर्यावरण विभागाच्या नियमांनुसार, नदीपात्रात पाणी असल्यास वाळू उत्खननास परवानगी देता येत नाही. असे केल्यास नदीच्या नैसर्गिक प्रवासाला बाधा पोहोचते आणि पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. मात्र, या सर्व नियमांना धाब्यावर बसवून काही घाटांचा ताबा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

 

प्रशासनाच्या भूमिकेवर संशय

 

पाणी असताना घाटांचा ताबा देणे ही बाब गंभीर असून, यात तहसील प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत आहे. नेमक्या कोणत्या आधारे आणि कोणाच्या दबावाखाली हा ताबा देण्यात आला, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. जर नियम धाब्यावर बसवून हे व्यवहार झाले असतील, तर संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी असलेले नियम केवळ कागदावरच राहणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

 

गोदावरी पात्रातील वाढती पाण्याची पातळी पाहता, तातडीने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर पाऊले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा, वाळू उपशाच्या नावाखाली नदीपात्राचे आणि पर्यावरणाचे न भरून निघणारे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

व्हॉट्सअप वाढदिवस!

आजचे युग हे सोशल मिडियाचे युग आहे आणि या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये अनेक मेसेजिंग ॲप्लिकेशन आहेत आपणही दररोज अनेक मेसेजिंग ॲप्लिकेशनचा वापर करतो. या मेसेजिंग ॲप्लिकेशनमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग ॲप्लिकेशन म्हणजे व्हाट्सअप. याच सर्वाधिक लोकप्रिय आणि वापरले जाणाऱ्या व्हॉट्सअप या मेसेजिंग ॲप्लिकेशनचा आज वाढदिवस आहे. व्हॉट्सअप हा आज परवलीचा शब्द झाला आहे. आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दुसरे कोणते ॲप्लिकेशन असो वा नसो पण व्हॉट्सअप हमखास बघायला मिळते. २४ फेब्रुवारी २००९ रोजी जेन कॉम याने व्हाट्सअप inc नावाची कंपनी स्थापन केली. व्हाटसअपचा निर्माता जेन कॉम याचा जन्म युक्रेन देशातील छोट्या गावात झाला. त्याचे वडील मजूर तर आई गृहिणी होती. युक्रेनमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यावर त्याचे वडील अमेरिकेत स्थलांतरित झाले. तिथे ते छोटीमोठी कामे करू लागले. जेन कॉम याला कॉम्प्युटर प्रोग्रामिंगची आवड होती. त्याच्या घराजवळच एक लायब्ररी होती. तेथून तो कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे पुस्तके आणत व घरच्या कॉम्प्युटरवर प्रोग्रामिंग करीत. पुढे त्याने कॉम्प्युटर सायन्समध्ये डिग्री मिळवून एका सॉफ्टवेअर कंपनीत सिक्युरिटी टेस्टर म्हणून काम सुरू केले. १९९७ साली याहू कंपनीने इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअर या पदावर त्याची नेमणूक केली. या कंपनीत त्याने ९ वर्ष नोकरी केली. दुसऱ्या कंपनीत नोकरी करण्यापेक्षा स्वतःची कंपनी सुरू करावी या विचाराने त्याने याहूला राजीनामा दिला. याहूमध्ये ब्रायन अकटन हा त्याचा सहकारी होता. त्यानेही याहूला राजीनामा दिला. दोघांनी मिळून स्वतःची कंपनी स्थापन करण्याचे ठरवले. त्या सुमारास ऍप्पल कंपनीने आयफोन बाजारात आणला होता. त्यात मेसेज पाठवण्याची सुविधा होती. त्यावरून त्यांना व्हॉट्सअपची कल्पना सुचली. पुढे दोघांनी त्यावर काम करण्यास सुरवात केली. या प्रयोगात त्यांना यश मिळाले का नाही हे विचारण्यासाठी त्यांच्या मित्राने त्यांना विचारले व्हॉट्सअप ! व्हॉट्सअप या शब्दाचा अर्थ होतो काय झाले ? हा शब्द कानावर पडता क्षणीच त्यांनी ठरवले आपल्या कंपनीचे नाव आपण व्हॉट्सअप हेच ठेवायचे. २४ फेब्रुवारी २००९ रोजी त्यांनी व्हॉट्सअप inc नावाची कंपनी स्थापन केली. सुरवातीला व्हॉट्सअपला खूपच कमी प्रतिसाद मिळाला कारण तेंव्हा अँड्रॉइड मोबाईलची संख्या खूप कमी होती पण जशी अँड्रॉइड मोबाईलची संख्या वाढत गेली तशी व्हॉट्सअप वापरणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. आज व्हॉट्सअप जगातील पहिल्या क्रमांकाचे एप्लिकेशन बनले आहे. जगातील किमान दोनशे कोटीहून अधिक लोक व्हॉट्सअपचा वापर करतात. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप असतेच. व्हॉट्सअपवर रोज एक लाख कोटीहून अशिक मेसेज सेंड होतात. व्हॉट्सअप वरुन दररोज ५०० कोटीहून अधिक फोटो तसेच १०० कोटीहून अधिक व्हिडीओ शेअर होतात. सुरवातीला फक्त इंग्रजीमध्ये असणारे व्हॉट्सअप आज ५३ भाषांमध्ये आहे. व्हॉट्सअप नेहमीच नवनवीन सुविधा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करुन देते. व्हिडिओ कॉल, ऑडियो कॉल, स्टेटस अशा नवनवीन सुविधा व्हॉट्सअप कडून वापरकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. आज व्हॉट्सअप वरून पैसेही पाठवता येऊ शकतात. २०१४ साली फेसबूकच्या मार्क झुकेरबर्ग याने १९ बिलियन डॉलरला जेन कॉम आणि ब्रायन अकटन यांच्याकडून व्हॉट्सअप खरेदी केले. आज व्हॉट्सअपची मालकी मार्क झुकेरबर्ग यांच्याकडे आहे. आज व्हॉट्सअप प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. आपली दिवसाची सुरुवात व्हॉट्सअपनेच होते. सकाळी झोपेतून उठल्यावर आपण जर पहिल्यांदा काय पाहत असतो तर ते व्हॉट्सअप !आपण झोपताना ही व्हॉट्सअप पाहूनच झोपतो. व्हॉट्सअप वर ग्रुपची सुविधा सुरू झाल्याने एकाच वेळी शेकडो लोकांना मेसेज पाठवण्याची सुविधा निर्माण झाली. व्हॉट्सअप वर आज कोयावधी ग्रुप आहे. केवळ मित्रांचे नातेवाईकांचे च नाही तर शासकीय नोकरांचे देखील ग्रुप आहे. शासकीय संदेश, आदेश देखील आता व्हॉट्सअप वर दिले जातात. लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या जीवनाच्या अविभाज्य भाव बनलेल्या व्हॉट्सअपला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

९९२२५४६२९५

वाळू उपशासाठी परराज्यातील मजुर गौडगावात दाखल

 

 

पाथरी:(प्रतिनिधी) गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा जोर धरून सुरू असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी तराफा आणि फराड्यांच्या साहाय्याने परराज्यातील मजूर आणून वाळू चोरी करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. या मजुरांचे चारित्र्य प्रमाणपत्र किंवा पोलिस वेरिफिकेशन झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला असून, पोलिसांकडे त्यांची नेमकी माहिती आहे का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गौडगाव हे परराज्यातील एक प्रमुख केंद्र ठरले आहे, जेथे गोदावरी नदीच्या विस्तीर्ण पात्रातून वाळू उपसा करून स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्यात येते. येथे ट्रॅक्टर, टेम्पो आणि बोटींच्या मदतीने दिवसा-रात्र अवैध वाळू वाहतूक चालू आहे. विशेषतः पाणीटंचाईमुळे उघड्या पडलेल्या नदीपात्रात भरदिवसा वाळू चोरांची जत्रा सुरू असल्याचे दिसून येते. या कामासाठी परराज्यातील मजूर तराफ्यांद्वारे आणले जातात, जे कोणत्या राज्यातून आले आहेत याची स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.

या मजुरांची पार्श्वभूमी संशयास्पद असू शकते. ते उत्तर प्रदेश, बिहार किंवा इतर राज्यांतून असण्याची शक्यता आहे, परंतु पोलीस वेरिफिकेशन नसल्याने गुन्हेगारी घटनांशी त्यांचा संबंध असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक ग्रामस्थांमध्ये याबाबत तीव्र असंतोष आहे.वाळू माफियांच्या जाळ्यात अडकलेल्या या मजुरांमुळे नदीपात्राचे पर्यावरणीय नुकसान होत असून, शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आ.

गोदावरी नदी ज्याला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते, ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे. तिच्या पाणलोट क्षेत्रात अनेक पाटबंधारे प्रकल्प आहेत, परंतु वाळू उपसामुळे नदीची जैवविविधता धोक्यात सापडली आहे. ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली असून, परराज्यातील मजूरांची पार्श्वभूमी तपासण्याची गरज अधोरेखित केली आहे. पोलिस विभागाने या मजुरांची यादी तयार करून चारित्र्य प्रमाणपत्र तपासावे आणि वाळू माफियांवर अंकुश लावावा, अशी अपेक्षा आहे.

 

स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करून या प्रकरणाचा खुलासा करावा, अन्यथा अवैध वाळू उपसाचा धंदा आणखी जोर धरेल. गौडगाव आणि गोदावरी खोऱ्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे अत्यावश्यक आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने गौंडगाव येथील अनधिकृत वाळू उपशाच्या तराफ्यावर तहसीलदारच्या पथकाची कारवाई.

पाथरी(प्रतिनिधी): पाथरी तालुक्यातील गौंडगाव येथील गोदावरी नदीपात्रात अवैध मार्गाने वाळू उपसा चालू असल्याची बाब उघड झाली असून, जिल्हाधिकारींच्या तात्काळ आदेशानुसार तहसीलदार एस.एन. हंदेश्वर यांच्या पथकाने दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या तराफ्यावर कारवाई केली. या कारवाईमुळे वाळू माफियांना मोठा धक्का बसला असला तरी, जनतेतून संघटित गुन्हेगारी कायद्याखाली कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

पाथरी तालुक्यातील गौंडगाव या गावाजवळ गोदावरी नदीच्या पात्रात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा राजरोस चालू होता. अधिकृत टेंडर सुटले असल्यासारखा दिवसा तराफ्याने वाळू उपसा करून गोदावरी काठावर हजारो ब्रास वाळूचे ढिगारे साचवले जात होते. या प्रकरणाची माहिती पाथरी येथील सुज्ञ पत्रकारांनी परभणी जिल्हाधिकारी यांना व्हिडिओ कॉलद्वारे दिली. तात्काळ प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी पाथरीचे तहसीलदार एस.एन.हांदेश्वर यांना कारवाईचे आदेश दिले.यावेळी मंडळ अधिकारी एम.ए.बागुल,तलाठी साजेद सय्यद ,विजय भदर्गे,नितिन गाडेकर,वाहन चालक साबने ईत्यादीसह दुपारी चारच्या सुमारास पथकाने घटनास्थळी धाड बसवली आणि अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या तराफ्यावर कारवाई करून पंचनामा केला.या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी,वाळू माफियांच्या हालचालींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गौंडगावासह गुंज, मर्डसगाव, नाथरा या गोदाकाठावरील गावांमध्ये केनी आणि तराफ्याच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. रात्री आणि पहाटे चार ते सात वाजता हायवा ट्रकद्वारे वाळूची वाहतूक केली जाते. महसूल विभागाच्या रात्रपाळी गस्ती पथकांचा मात्र काहीच पायउशीरा दिसत नाही. परिणामी, शासनाच्या लाखो रुपयांच्या गौण खनिज महसुलावर पाणी फिरत आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असून, भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे.

गावकऱ्यांनुसार, गौंडगावात अनेक दिवसांपासून हा अनधिकृत वाळू उपसा सुरू असून, तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदारांना याची माहिती असतानाही दुर्लक्ष केले जात आहे.वाळू माफियांशी आर्थिक हितसंबंध जोडले गेल्याने कारवाई टाळली जात असल्याच्या चर्चा गावात रंगल्या आहेत. जनतेतून सध्याच्या ठराविक कारवाईऐवजी संघटित गुन्हेगारी कायद्याखाली गुन्हे दाखल करून माफियांवर खरा घाव घालावा, अशी मागणी होत आहे. नांदेडसारख्या जिल्ह्यांत पोलिस आणि महसूल पथकांनी कोट्यवधी रुपयांचा ऐवज जप्त केला असून, परभणीमध्येही अशीच कठोर मोहीम अपेक्षित आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने वाळू धोरण जाहीर करण्याची घोषणा केली असून, अवैध उपसा रोखण्यासाठी ई-लिलाव आणि कठोर नियमांचा समावेश आहे.गोदावरीसारख्या प्रमुख नद्यांमध्ये वाळू तस्करी थांबत नसल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे. जिल्हाधिकारींच्या या तात्काळ कारवाईमुळे अवैध वाळू उपसा विरोधात जनजागृती वाढेल,अशी अपेक्षा आहे

 

 

 

“वाळू उपशासाठी परराज्यातील मजुर गौडगावात दाखल”

 

 

गौडगाव: गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा जोर धरून सुरू असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी तराफा आणि फराड्यांच्या साहाय्याने परराज्यातील मजूर आणून वाळू चोरी करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. या मजुरांचे चारित्र्य प्रमाणपत्र किंवा पोलिस वेरिफिकेशन झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला असून, पोलिसांकडे त्यांची नेमकी माहिती आहे का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गौडगाव हे परराज्यातील एक प्रमुख केंद्र ठरले आहे, जेथे गोदावरी नदीच्या विस्तीर्ण पात्रातून वाळू उपसा करून स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्यात येते. येथे ट्रॅक्टर, टेम्पो आणि बोटींच्या मदतीने दिवसा-रात्र अवैध वाळू वाहतूक चालू आहे. विशेषतः पाणीटंचाईमुळे उघड्या पडलेल्या नदीपात्रात भरदिवसा वाळू चोरांची जत्रा सुरू असल्याचे दिसून येते. या कामासाठी परराज्यातील मजूर तराफ्यांद्वारे आणले जातात, जे कोणत्या राज्यातून आले आहेत याची स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.

या मजुरांची पार्श्वभूमी संशयास्पद असू शकते. ते उत्तर प्रदेश, बिहार किंवा इतर राज्यांतून असण्याची शक्यता आहे, परंतु पोलीस वेरिफिकेशन नसल्याने गुन्हेगारी घटनांशी त्यांचा संबंध असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक ग्रामस्थांमध्ये याबाबत तीव्र असंतोष आहे.वाळू माफियांच्या जाळ्यात अडकलेल्या या मजुरांमुळे नदीपात्राचे पर्यावरणीय नुकसान होत असून, शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

गोदावरी नदी ज्याला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते, ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे. तिच्या पाणलोट क्षेत्रात अनेक पाटबंधारे प्रकल्प आहेत, परंतु वाळू उपसामुळे नदीची जैवविविधता धोक्यात सापडली आहे. ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली असून, परराज्यातील मजूरांची पार्श्वभूमी तपासण्याची गरज अधोरेखित केली आहे. पोलिस विभागाने या मजुरांची यादी तयार करून चारित्र्य प्रमाणपत्र तपासावे आणि वाळू माफियांवर अंकुश लावावा, अशी अपेक्षा आहे.स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करून या प्रकरणाचा खुलासा करावा, अन्यथा अवैध वाळू उपसाचा धंदा आणखी जोर धरेल. गौडगाव आणि गोदावरी खोऱ्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे अत्यावश्यक आहे.

महाशिवरात्री निमित्त पोहेटाकळीत भाविकांसाठी फराळाचे आयोजन; टेंगसे बंधूंचा सामाजिक उपक्रम

पाथरी (प्रतिनिधी)महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त पोहेटाकळी येथे शिवभक्तांसाठी फराळ व प्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. रेनापूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश टेंगसे व ज्ञानेश्वर टेंगसे या टेंगसे बंधूंनी हा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले.
महाशिवरात्री निमित्त पहाटेपासूनच परिसरात भक्तांची मोठी गर्दी होत होती. शिवमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या तसेच प्रवासादरम्यान थांबणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ, नीटनेटकी आणि नियोजनबद्ध पद्धतीने फराळ व प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. उपवास करणाऱ्या भक्तांचा विचार करून साबुदाणा खिचडी, शेंगदाण्याचा लाडू, फळे व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांना प्रसाद वाटप केले.
टेंगसे बंधू गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून, सण-उत्सवांच्या माध्यमातून समाजात एकोप्याचा आणि सेवाभावाचा संदेश देण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. त्यांच्या या उपक्रमालाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी पुढाकाराचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमास परभणी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब काका टेंगसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच पाथरी येथील प्रसिद्ध व्यापारी घनश्याम कासट, संदीप टेंगसे, शामराव गोंगे, ज्ञानोबा गोंगे, संपतराव गोंगे, बापूराव गोंगे, रामदास गोंगे, लक्ष्मण टेंगसे, गणेश बागल, मुरलीधर गोंगे व राजाराम गोंगे यांच्यासह रेनापूर व पोहेटाकळी परिसरातील अनेक ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाविकांनी प्रसादाचा लाभ घेत टेंगसे बंधूंच्या सामाजिक जाणिवेचे मनापासून कौतुक केले. धार्मिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेचा आणि सेवाभावाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला असून, समाजकार्याच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रेरणा देणारा ठरला आहे.

मौजे मर्डसगाव: गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उत्खननावर महसूल प्रशासनाची सखोल कारवाई

पाथरी (विशेष प्रतिनिधी):मर्डसगाव गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर महसूल प्रशासनाने दुपारी सापळा रचून मोठी कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर आणि केनीसह वाळू भरलेली वाहने जप्त करण्यात आली असून, ही वाहने पाथरी तहसील कार्यालयात जमा केली आहेत.आज, दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी मौजे मरडसगाव परिसरातील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. नायब तहसीलदार रमेश धोपे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ सापळा रचला.या कारवाईदरम्यान अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि केनी ताब्यात घेतल्या. सदर वाहने पाथरी तहसील कार्यालयात नेली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या मोहिमेत ग्राम महसूल अधिकारी साजिद सय्यद, विजय भदर्गे, श्रीनिवास तायनाक, सदाशिव खेडकर आणि अतुल जोशी यांनी सक्रिय सहभाग घेतला.

ही कारवाई उपविभागीय अधिकारी पाथरी आणि तहसीलदार पाथरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अवैध वाळू उत्खनन आणि शवाळू माफिया विरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील. गोदावरी नदीसारख्या महत्त्वाच्या नदीपात्रातून होणाऱ्या अवैध उत्खननामुळे नदीची पारिस्थितिक संतुलन बिघडते आणि स्थानिक पर्यावरणाला धोका निर्माण होतो. अशा कारवाया वाढविण्याचे प्रशासनाने ठोस उद्दिष्ट ठेवले आहे.

गोदावरी नदीतील अवैध वाळू उत्खननही मराठवाड्यातील सतत चालू असलेली समस्या आहे.मौजे मरडसगाव प्रकरणात महसूल प्रशासनाने स्वतंत्रपणे पावले उचलून अवैध वाळू वाहतूक रोखली.स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.ते म्हणतात की,गोदावरी नदी पात्रामधील अवैध उत्खननामुळे शेतीसाठी आवश्यक वाळूचा तुटवडा भासतो आणि नदीकाठच्या जमिनींना नुकसान होते. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,या कारवाईमुळे वाळू माफियामध्ये भीती पसरली असून, पुढील काळात नियमित तपासण्या वाढवल्या जाणार आहेत.अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी नागरिकांनीही माहिती द्यावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.या घटनेमुळे पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीच्या संरक्षणाबाबत जागृती होईल. प्रशासनाने स्पष्ट केले की, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून दंड आकारला जाईल आणि वाहने जप्त राहतील.

अवैध वाळू उपशावर कारवाईचा अभाव: पाथरीतील पथकांचा भेदभाव?

पाथरी तालुक्यातील नदीनाल्यांवर अवैध वाळू उपसाचा धंदा बिनधास्त चालू आहे. एका महसूल पथकाने छोटीमोठी कारवाई केली तरी इतर पथकांकडून तर छोटीही कारवाई दिसत नाही. या वाळूमाफियाच्या उद्धवासाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नदीपात्र खरवडून पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असताना प्रशासनाची भूमिका संशयास्पद दिसत आहे.

पाथरी तालुक्यातील विविध नद्यांवर, विशेषतः स्थानिक नदीनाल्यांवर अवैध वाळू उपसा नेहमीचाच प्रकार झाला आहे. गेल्या काही महिन्यांत एका विशेष महसूल पथकाने छोट्या-मोठ्या कारवाया करून काही जप्ती केल्या. उदाहरणार्थ, चोरट्या मागणीने वाळू उपसा आणि वाहतूक थांबवण्यासाठी या पथकाने ठोस पावले उचलली. मात्र, इतर पथकांकडून मात्र पूर्ण शांतता आहे. मोठी कारवाई तर दूर, छोटीही दिसत नाही. यामुळे वाळूमाफिया अधिक निर्भीड झाले आहेत. नदीपात्रात खड्डे पडून जलस्रोत धोक्यात आले आहेत, तर स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीला धोका वाढला आहे.स्थानिक नागरिकांच्या तक्रारींनुसार, पाथरी परिसरात रात्रीच्या वेळी जेसीबी, ट्रॅक्टर आणि टिप्परने वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असते. एका पथकाने काही ठिकाणी छापे टाकून वाळू साठा जप्त केला असला तरी इतर पथक गस्त घालतानाही दिसत नाहीत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष स्पष्ट आहे. सिल्लोडसारख्या जवळच्या तालुक्यात महसूलने ९२२ ब्रास वाळू जप्त करून २ कोटी ८३ लाखांचा साठा हस्तगत केला, तर नांदेडमध्ये २ कोटींच्या मुद्देमालाची कारवाई झाली. अकोला आणि बुलढाण्यातही मध्यरात्रीच्या छाप्यांत यश मिळाले. पाथरीत मात्र असा उत्साह दिसत नाही.या भेदभावपूर्ण कारवायांमुळे अवैध वाळू उपसाचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. एका बाजूला एक पथक कार्यरत असताना दुसऱ्या बाजूला पूर्ण उपेक्षा का? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व पथकांना सक्रिय करावे, अन्यथा वाळूमाफियाचा धंदा वाढेलच,असा सवाल स्थानिकांकडून होत आहे. पर्यावरण संरक्षण आणि गौण खनिजाचे रक्षण हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. राहुरीसारख्या ठिकाणी पोलिसांनी ५ लाखांचा ट्रॅक्टर जप्त केल्यासारखे पाथरीतही संयुक्त कारवाया अपेक्षित आहेत.स्थानिक शेतकरी संघटना आणि पर्यावरणप्रेमींनी या प्रकरणाची दखल घेऊन मोर्चा काढण्याची तयारी दाखवली आहे.महसूल विभागाने आता शब्द नव्हे, कृतीने पथके सक्रिय करावीत, अन्यथा नदीपात्रांचे संरक्षण अशक्य होईल. वाळूमाफियांना कायद्याचा धाक बसवण्यासाठी सर्व पथकांना एकत्र यावे, अशी मागणी वाढत आहे. या कारवाईत नागरिकांचेही सहकार्य महत्त्वाचे ठरेल.

 

पावणे दहा कोटींचे कोकेन आणि एमडी ड्रग्ज जप्त; दोन विदेशी महिलांना अटक ● अंबाजोगाईचे रहिवासी असलेल्या एपीआय गोविंद बास्टे यांची सहकाऱ्यांसह मुंबईत धडक कारवाई

वसई: नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव परिसरात तुळींज पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. एका इमारतीत छापा टाकून पोलिसांनी सुमारे ९ कोटी ७० लाख २६ हजार रुपये किमतीचे १० किलो ३२७ ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी युगांडातील दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईत मूळचे अंबाजोगाई येथील असलेले आणि सध्या तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहा. पोलीस निरीक्षक गोविंद बास्टे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

मिळालेली माहिती अशी की, तुळींज पोलीस ठाण्याचे पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांची पडताळणी करण्यासाठी ‘जम्बो ऑपरेशन’ राबवीत होते. यावेळी मोरेगाव तलाव जवळील प्रियांका अपार्टमेंटमधील रूम क्रमांक २०६ मध्ये पथकाने छापा टाकला. या रूममध्ये युगांडा देशाच्या नागरिक असलेल्या बाबिर्ये ग्रेस, वय ३३ आणि नाकायिझ आयशा, वय २७ या दोन महिला राहत होत्या. पोलिसांना त्यांच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांची आणि घराची झडती घेण्यात आली.

या झडतीदरम्यान किचनमध्ये फ्रिजच्या मागे लपवून ठेवलेले १ किलो ४०५ ग्रॅम कोकेन आणि हॉलमध्ये ठेवलेले ८ किलो ९२२ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) असा एकूण १० किलोहून अधिक साठा आढळून आला. बाजारात या अमली पदार्थांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. यासोबतच पोलिसांनी दोन मोबाईल फोन आणि वजनकाटा जप्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलांकडे भारतात वास्तव्यासाठी वैध पासपोर्ट आणि व्हिसा नसल्याचेही समोर आले आहे. या दोन्ही महिलांवर एपीआय गोविंद बास्टे यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायदा आणि विदेशी नागरिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक घाडीगावकर, एपीआय गोविंद बास्टे, सपोनि सुनिल पवार, पोउपनि राहुल फड, सपोनि बाबर, सफौ गाणेकर, पोह मुळे, पोह दिगंबर परजणे, पो.अं. आजिनाथ गिते, पोशि पाटील, पोअं सागर पाटील, पोअं सोनवणे, पोअं झंजे, पोअं प्रसाद पालवे, मपोशि गीरी यांनी पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास एपीआय बास्टे करीत आहेत.

देवनांद्रा गटामध्ये वंचित बहुजन आघाडीचा नवा ट्विस्ट; पूजा विक्रम गायकवाड यांना पुरस्कृत उमेदवार घोषित

महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवणारी वंचित बहुजन आघाडी आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपली ताकद प्रदर्शित करण्याची तयारी करत आहे. देवनांद्रा गटामध्ये सोमवारी ३ फेब्रुवारी झालेल्या प्रचार सभेत आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी वंचित घटकांना सत्तेचे सूत्र देण्याचे आवाहन केले,तर शेवटच्या क्षणी पूजा विक्रम गायकवाड यांना जिल्हा परिषद उमेदवार म्हणून घोषित करत राजकीय खेळीचा एक नवा अध्याय लिहिला गेला.

प्रस्थापित पक्षांच्या विरोधात वंचितचा संदेश

 

देवनांद्रा गटातील पंचायत समिती गण देरगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सुजात आंबेडकर यांनी हवेदार शब्दांत घोषणा केली. त्यांनी म्हटले की “वंचितांकडे एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सूत्र देऊन बघा, विकास काय असतो ते आम्ही दाखवून देऊ.” हा संदेश प्रस्थापित राजकीय पक्षांच्या प्रशासकीय अनुभवाच्या विरुद्ध वंचित घटकांच्या आकांक्षा व्यक्त करतो.या सभेमध्ये आंबेडकर यांनी या क्षेत्रातील समाजातील वंचित आणि शोषित घटकांच्या उत्थानावर भर दिला. त्यांच्या भाषणाचा सारांश असा की दीर्घकाल समाज व्यवस्थेच्या बाहेरी राहिलेल्या घटकांना एकदा शासन-प्रशासनाची जबाबदारी सोपविल्यास त्यांचा विकास दृष्टिकोन भिन्न आणि अधिक प्रभावी ठरेल.

oplus_8388610

शेवटच्या क्षणी नवा ट्विस्ट

 

राजकीय गणिताचे हिशेब पूर्ण झाल्यानंतर, शेवटच्या क्षणी वंचित बहुजन आघाडीने एक महत्वाचा निर्णय घेतला. सुजात आंबेडकर यांनी देवनांद्रा गटामध्ये जिल्हा परिषद उमेदवार म्हणून पूजा विक्रम गायकवाड यांना वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असे घोषित केले. हा निर्णय या गटातील निवडणुकीचे संपूर्ण समीकरण बदलून देणारा साबित झाला.या शेवटच्या क्षणी आलेल्या या घोषणेने गटामध्ये एक अपेक्षित राजकीय हिलचाल निर्माण केली. अगोदर या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांचे उमेदवार सरीसरी मतांच्या लढ्यामध्ये होते, परंतु आता वंचित बहुजन आघाडीचा प्रवेश मतांचे विभाजन कसे होणार हे पाहणे महत्वाचे ठरले आहे.

oplus_8388610

प्रतिद्वंद्वी उमेदवारांचे संघर्ष

 

देवनांद्रा गटामध्ये निवडणुकीचा प्रचंड संघर्ष चालू आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली अजय थोरे, शिवसेनेच्य (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शांताबाई प्रकाश इंगळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुर्गा विष्णु उगले आणि शिंदे सेनेचे सुमनबाई चक्रधर उगले उमेदवार हे चार मुख्य दावेदार मैदानात होते. या सर्वांच्या दरम्यान लढाई निर्णायक ठरणारी होती.परंतु वंचित बहुजन आघाडीचे आगमन या मतांच्या समीकरणात नवा घटक जोडले आहे. पूजा विक्रम गायकवाड यांचे नाव घोषित केल्याने या गटातील वंचित व अल्पसंख्यक घटकांचे मत कोणत्या उमेदवारांकडे जाणार हे प्रश्न निर्माण झाला आहे.

oplus_8388610

वंचित बहुजन आघाडीचा राजकीय धडाकेबाजी

 

विगत महिन्यांत वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपरिषदेत प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनी नगराध्यक्ष पद जिंकले, तर अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळीत अख्तर खातून यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला.राज्यभरात सुमारे ७० पेक्षा अधिक नगरसेवक आणि दोन ठिकाणी नगरपरिषद अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले आहेत.या यशामुळे वंचित बहुजन आघाडीला आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रवेश करण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. संगठनाच्या मध्यवर्ती कार्यालयात भरीव संख्येने उमेदवारांची मुलाखत घेणे हा त्यांच्या या महत्वाकांक्षीपूर्ण योजनेचा भाग आहे.

 

गटामध्ये चर्चा आणि अनुमान

oplus_8388610

देवनांद्रा गटातील राजकीय गोलीतून सुजात आंबेडकर यांच्या या निर्णयाची चर्चा बरीच जोरशोरांचे चालू आहे. मतदारांमध्ये आणि राजकीय विश्लेषकांमध्ये या नवा ट्विस्टला लेकर विविध मत व्यक्त होत आहेत. काहींचे मत असे आहे की वंचित बहुजन आघाडीने हा कौशल्यपूर्ण पदक्षेप केला आहे, जो या गटातील निवडणुकीचे अंतिम निर्णय खेचून आणू शकतो.

विशेषज्ञांचे विश्लेषण असे सूचित करते की पूजा विक्रम गायकवाड यांचा अपक्ष उमेदवार असून त्यांना वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार घोषित करणे हा एक रणनीतिक कदम आहे.या माध्यमातून आघाडी अपक्ष उमेदवारांना आपल्या ध्वजांखाली आणण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याचा परिणाम प्रस्थापित पक्षांच्या मतांचे विखंडन होऊ शकतो.

 

वंचित घटकांचा सशक्तिकरण आणि विकास

वंचित बहुजन आघाडीचा मूळ संदेश समाजातील शोषित आणि वंचित घटकांचा सशक्तिकरण हा आहे. संगठनाच्या नेत्रेस्त्वामुळे या घटकांमध्ये एक नवीन आशा आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यांच्या विकासाचा मार्ग प्रस्थापित पक्षांच्या माध्यमातून येणार नाही, असा विश्वास या घटकांमध्ये निर्माण होत आहे.देवनांद्रा गटातील हा घोषणा या विश्वासाचा व्यावहारिक उदाहरण बनला आहे. वंचित बहुजन आघाडी आता या क्षेत्रातील मतदार यंत्रणेत एक महत्वाचा खेळाडू बनून उभा आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत हादगावचा किंगमेकर हनुमान मुंढे: दिग्गजांची लढाई वंचितच्या हातात;ओबीसी-बौद्ध-मुस्लिम मतांची खेळी

पाथरी(प्रतिनिधी) दि. २ फेब्रुवारी: महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या रिंगणात हदगाव गट हा राजकीय युद्धभूमी ठरला आहे. येथे शिवसेना (उबाठा गट)चे सुरेशराव ढगे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अजिंक्य नखाते आणि शिवसेना (शिंदे गट)च्या शकुंतला फासाटे या दिग्गज उमेदवारांमध्ये त्रिकोणी लढत रंगली आहे. मात्र,वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनुमान मुंढे हे या लढाईचे किंगमेकर ठरत असल्याचे गटातील राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चेत आहे.

या गटात ओबीसी मतदार ४० टक्के, बौद्ध मतदार १० टक्के आणि मुस्लिम मतदार १० टक्के असा एकूण ६० टक्के मतांचामोठा वाटा आहे. हे सर्व मतदार वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते सांगत आहेत. यामुळे तीनही प्रमुख पक्षांच्या दिग्गजांना विजयाची खात्री नसून, हनुमान मुंढेंच्या मतांचा निर्णायक प्रभाव पडणार आहे. गटातील प्रचारकार्यात मोठ्या प्रमाणावर सभा, रॅली आणि घराघरापर्यंत पोहोच होत असून, दिग्गज उमेदवारांकडून वंचित मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.

हादगाव गटाची राजकीय पार्श्वभूमी पाहता, हा गट परभणी जिल्हा परिषदेतील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. येथील ओबीसी समाज हा पारंपरिकदृष्ट्या निवडणुकांमध्ये निर्णायक ठरतो, तर बौद्ध आणि मुस्लिम मतदार हे सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर एकजूट होतात. वंचित बहुजन आघाडीने या मतदारांना लक्ष्य करून हनुमान मुंढे यांना उभे केले असून, त्यांच्या स्थानिक लोकप्रियतेमुळे ते किंगमेकर म्हणून उदयास आले आहेत. गेल्या आठवड्यात वंचितचे पक्षप्रमुख प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा झाली तर आज दिनांक २ फेब्रुवारी रोजी रेनाखळी येथे सुजात आंबेडकर यांची सभा होणार आहे.त्याचबरोबर मुंढे यांनी गेल्या काही दिवसांत गावोगावी सभा घेऊन आरक्षण, शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर जागृती केली असून, मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला आहे.

दुसरीकडे,शिवसेना(उबाठा)चे सुरेशराव ढगे हे स्थानिक नेत्यांच्या पाठबळावर मजबूत आहेत,तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अजिंक्य नखाते हे पक्षसंघटनेच्या बळावर पुढे आहेत.शिवसेना शिंदे गटाची शकुंतला फासाटे मात्र महिलांच्या मतांवर भर देत आहेत.तरीही, या तिघांपैकी कोणालाही एकट्याने विजय मिळवणे कठीण असून, वंचितचे मुंढे यांच्या मतांचा वाटा ठरविणारा ठरेल,असे मत विश्लेषक देत आहेत.गटातील कार्यकर्ते सांगतात की,”हे मतदान वंचितचे असल्याने हादगावचा निकाल मुंढेंच्या हातात आहे.”

हादगावसारख्या गटांमधील किंगमेकर भूमिका जिल्हा परिषदेच्या संख्याबळावर परिणाम करणारी ठरेल.हादगावकर मतदार आता हनुमान मुंढेंच्या किंगमेकर भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत. विजयाचा निर्णय या ६० टक्के वंचित मतांचा असणार हे स्पष्ट असून, दिग्गजांना नव्या रणनीती आखाव्या लागतील.

पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून ठसा उमटवतील?

 

सुनेत्रा अजित पवार या नावाच्या मध्ये अजित नावाची ताकद आहे ती सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या पतीचे म्हणजे अजित पवार यांचे योगदान मोठे आहे.उभ्या महाराष्ट्राला शोकसागरात ठेवून अजित पवार मृत्यूनंतरही अजित आहेत, हे कळत .कारण, त्यांच्या जाण्याची जाणीव आजही स्वप्नवत वाटते. मृत्यूसुध्दा कर्तव्यात आला.भल्या पहाटे उठणारा लोकप्रतिनिधी सर्वांना आपोआप कामाला लावावं लागतं असेल. कुठलाही राज्याचा प्रमुख व्यक्तीसाठी काही खास शासकीय यंत्रणा असते.ही सगळी यंत्रणा अजित पवार कधी काय काम काढतील याची शाश्वती नसल्याने सतर्क असायची. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येत तेव्हा तेव्हा अधिकार्यांची भंबेरी उडत. किंबहुना‌ त्यांना सतर्क राहावे लागत असे.एक उत्तम प्रशासक असलेल्या अजित पवार यांच्या पत्नी सुध्दा शिस्तबद्ध पद्धतीने राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील यात तिळमात्र शंका नाही. सुनेत्रा पवार पवार या राजकारणात नवख्या वाटत असल्या तरी त्यांनी अजित पवार यांची कार्यशैली पत्नी म्हणून सुनेत्रा पवार यांनी पाहिली आहे. त्यामुळे त्यांच्यात अजित पवार यांच्या वक्तशीरपणा शिस्त आणि कर्तव्यकठोरपणा त्यांच्यात असणारच यात दूमत नाही. सुनेत्रा पवार या भारतीय राजकारणातील आहेत. त्यांच्या घरातच देशाच आणि राज्याच राजकारण शिजत म्हटलं तर योग्य. त्यामुळे राजकारण हा शब्द सुनेत्रा पवार यांना नवखा नाही. डोंगराएवढ दूख उराशी बाळगून त्या पुढे आल्या आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याबाबत अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिली.मात्र, अजित पवार यांना खरी श्रद्धांजली यापेक्षा वेगळी काय असू शकते.पती गेल्याच दू:ख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुटुंबप्रमुख गेल्याच दुःख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कुटुंबातील सदस्यांना नसेल काय? अख्खा महाराष्ट्र अजित पवार यांच्या जाण्याने हळहळतोय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुटुंब प्रमुख गेल्याचं दुःख कुटुंबाला किती असेल?त्यांनी कुटुंबाला छाया दिली कार्यकर्त्यांना उभं केलंय.पण, राज्याच्या विकासासाठी दू:ख उराशी बाळगून सुनेत्रा पवार पुढे आल्या खर तर त्यांना हीच श्रद्धांजली आहे.राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठसा उमटवतील यात दूमत नाही.कारण,त्या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. हे विसरून चालणार नाही.त्या या पदावर असलेल्या पहिल्या महिला आहेत. यापूर्वी, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्या म्हणून महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सदस्या होत्या. बारामती टेक्सटाईल कंपनीच्या अध्यक्षा आणि एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या सीईओ आहेत. २०२४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत बारामती येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या मात्र, त्यांचा पराभव झाला.त्यांच्या नणंद सुप्रिया सुळे यांच्याकडून १.५८ लाख मतांनी पराभूत झाल्या.हा जिव्हारी लागणारा पराभव आणि बहिणीचा विजय यात अजित पवार कधी गंभीर झाले नाहीत.राजकारण ते त्याच वेळी संपवत आणि कामाला सुरुवात करत असतं.आज त्यांची सहचारिणी राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री झालीय. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या मराठवाड्यातील आहेत . त्यामुळे अजित पवार मराठवाड्याचे जावई . सुनेत्रा यांचा जन्म उस्मानाबाद येथील तेर येथे बाजीराव पाटील यांच्या पोटी झाला. त्या माजी राज्यमंत्री आणि लोकसभा खासदार पद्मसिंह पाटील यांच्या बहिणी आहेत.राजकारणातील मोठं प्रस्थ पद्मसिंह पाटील यांच्याभोवती होतं.२०१० मध्ये, सुनेत्रा यांनी पर्यावरणीय मंच ऑफ इंडियाची स्थापना केली, जी सेंद्रिय शेती, इको-व्हिलेजेस आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित एक स्वयंसेवी संस्था आहे. पर्यावरण जागरूकता पसरवण्यासाठी आणि शाश्वत पद्धती लागू करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना “ग्रीन वॉरियर अवॉर्ड” आणि इतर प्रशंसा मिळाली आहे. २०११ पासून त्या फ्रान्समधील जागतिक उद्योजकता मंचाच्या थिंक टँक सदस्य आहेत, शाश्वत विकास आणि उद्योजकतेवरील जागतिक चर्चांमध्ये योगदान देतात. सुनेत्रा पवार या शरद पवार यांनी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त म्हणून देखील काम करतात. त्या नियमितपणे तिच्या उपक्रमांवर देखरेख करतात, २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची तरतूद सुनिश्चित करतात. शिक्षणातील त्यांचा सहभाग २०१७ पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून त्यानी काम पाहिले आहे. महिलांना संधी मिळायला हवी . तीचं सोनं केल्याशिवाय त्या राहत नाहीत हा आजवरचा इतिहास सांगतो.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पक्षाची आणि मुख्यमंत्री पदाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळत आहेत. बहुजन समाज पक्षाला उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती सांभाळत आहेत. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी याच्या निधनानंतर सोनिया गांधी यांनी पक्ष सांभाळला.अशी अनेक उदाहरणे देता येतील. महिलांनी फक्त घर सांभाळावे तिला जमेल का? दुसऱ्याच्या हातचं बाहूल होतील असे प्रश्न करण्यापेक्षा महिलांना संधी किती दिली जाते?याचा विचार मात्र आपण कधी केला आहे का? सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्या जाण्याने त्यांना पक्षाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी लागते. मात्र, अजित पवार यांच्या कामाचा झपाटा विलक्षण होता ते सुनेत्रा पवार यांनी जवळून पाहिला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आणि पक्षाच्या सर्वेसर्वा म्हणून आदर्श निर्माण करतील यात संदेह नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आपल्या कार्यातून अजित पवारांना स्वर्गीय नव्हे तर अजित ठेवतील. अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

– पदमाकर उखळीकर ,

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

मो.९९७५१८८९१२.

kalpadmakarukhlikar@gmail.com