परभणी(प्रतिनिधी): पाथरी ते इंजेगाव राष्ट्रीय महामार्ग ५४८ वर आर.बी. घोडके इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीने रोड दुपदरीकरण आणि चौपदरीकरणाच्या नावाखाली हजारो अनधिकृत झाडांची कत्तल केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पर्यावरण ध्वंसकारी कृत्यामुळे स्थानिक पर्यावरणवाद्यांसह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र धर्मे यांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला असून, कंपनीवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक चार, बीड येथील अधिकाऱ्यांनी आर.बी.घोडके इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला पाथरी ते इंजेगावपर्यंत ४१ किलोमीटर लांबीच्या रोडचे दुपदरीकरण आणि चौपदरीकरणाचे टेंडर दिले होते. या कामाच्या कार्यक्षेत्रात मध्यभागापासून दोन्ही बाजूने आठ मीटरपर्यंत अडथळा ठरणारी केवळ २२९ झाडे (लिंब, पिंपळ, सिरस, बाभूळ, उंबर, सौंदड, वर्ड, बोर, पळस, गुलमोहर इत्यादी) तोडण्याची परवानगी वन विभागाने दिली होती. मात्र, कंपनीने या मर्यादेचे उल्लंघन करून रोडवरील सर्सकट हजारो झाडांची कत्तल केली असल्याचे पुरावे समोर आले आहेत. यामुळे राष्ट्रीय महामार्ग ५४८ वर पर्यावरणाचा मोठा ऱ्हास झाला आहे.

या प्रकरणाने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शासन दरवर्षी शतकोटी वृक्षलागवड मोहिमा राबवून कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, राष्ट्रीय महामार्गांच्या कामाच्या नावाखाली कंपन्यांकडून झाडांची अशा प्रकारे कत्तल होणे हे विरोधाभासी आहे. यातून वरकमाईसाठी नियमांचे उल्लंघन होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक रहिवाशांनी सांगितले, की या कत्तलीमुळे रोड किनारी सावली आणि ऑक्सिजन पुरवठा कमी झाला असून, प्रदूषण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शिवसेनाचे परभणी जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. ११ डिसेंबर रोजी त्यांनी परभणी प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देऊन आर.बी. घोडके इन्फ्रा कन्स्ट्रक्शनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. २३ डिसेंबरला पुन्हा निवेदन देताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला, की दोन दिवसांत कंपनीवर कारवाई झाली नाही तर २९ डिसेंबर रोजी वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे जाहीर केले. धर्मे म्हणाले, “पर्यावरणाचे रक्षण हे सर्वांचे कर्तव्य आहे. घोडके कन्स्ट्रक्शनने हजारो झाडांची अनधिकृत कत्तल करून निसर्गाचा लढवून टाकला आहे. वन विभागाने तातडीने कारवाई करावी.”
या प्रकरणाची चाहूल लागताच स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनीही हालचाली सुरू केल्या आहेत.पाथरी -इंजेगाव राष्ट्रीय महामार्ग हे बीड आणि परभणी जिल्ह्यांना जोडणारे महत्त्वाचे रस्ते आहे. येथील वृक्षकत्तलमुळे वाहनचालकांना उष्णतेचा त्रास होईल आणि जैवविविधता नष्ट होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. वन विभागाने अद्याप याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही, पण शिवसेनेच्या अल्टिमेटममुळे प्रकरण तीव्र स्वरूप धारण करत आहे.
राष्ट्रीय महामार्ग ५४८वर घडलेल्या या घटनेने अनधिकृत वृक्षकत्तल आणि रोड कन्स्ट्रक्शन नियमांचे पालन याबाबत नवीन चर्चा सुरू झाली आहे. संबंधित विभागांनी तात्काळ तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनांना वेग येईल, असे मत व्यक्त केले जात आहे.
यापूर्वी ते परिविक्षाधीन पोलिस उपाधिक्षक पदावर इचलकरंजी येथे कार्यरत असताना प्रथम इचलकरंजीत अवैध व्यवसायाला त्यांनी चांगलाच चाप लावला असताना त्यांची एका महिन्यातच तडकाफडकी बदली झाल्यामुळे तेथे नागरीकासह विविध राजकीय पक्ष व संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. यानंतर त्यांनी जळगाव येथे कामगिरी बजावली असून जळगाव येथुन त्यांची नागपूर येथे विशेष कृती दलाचे अधिक्षक पदावर बदली झाली होती. वर्षभरातच त्यांना केंद्रीय प्रतिनियुक्तीवर केंद्रात बोलावले गेले होते तीन महिन्यांपूर्वी २४ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे दहशतवादी विरोधी पथकाच्या अधिक्षकपदी नियुक्ती झाली होती. नगरपालिका निवडणुकांची आचार संहीता संपताच २२ डिसेंबर सोमवार रोजी त्यांची हिंगोलीच्या पोलिस अधिक्षकपदी बदली करण्यात आली २३ डिसेंबर रोजी त्यांनी आपला पदभार स्विकारला.







पाथरीसारख्या तालुक्यांत अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभाग भरारी पथके तैनात करतो. मात्र, अलीकडील घटनांमधून असे दिसते की, वाळू माफियांचा प्रभाव इतका प्रबळ आहे की, काहीवेळा अधिकाऱ्यांनाही धमक्या मिळतात. उदाहरणार्थ, परभणी जिल्ह्यातील इतर ठिकाणीही अशा कारवायांमध्ये पोलिस आणि महसूल पथकांना अडथळे आणले गेले आहेत. तरीही, या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनावरील विश्वास वाढला असून, गोदावरी नदी संरक्षणासाठी आणखी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.अवैध वाळू उपसामुळे नदीची खोली वाढत असल्याने पूरप्रवणता वाढते आणि शेतजमिनींना धोका निर्माण होतो. शासनाने गौण खनिज धोरणांत कडक अंमलबजावणी केली तरच वाळू माफियांचा उद्धव नष्ट होईल.पाथरी तालुक्यातील ही कारवाई भविष्यातील छाप्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.सदरील कारवाई उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रमेश धोपे, तलाठी विजय भदर्गे, सय्यद साजिद आणि श्रीनिवास तायनाक, सहाय्यक महसूल अधिकारी वसंत पिटले यांनी केली आहे.
निवडणुकीसाठी मतदान 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार आहे. तर मतमोजणी 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार 23 डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्रांचे वितरण प्रभाग समिती �ब� कार्यालयातून संपूर्ण शहरासाठी एकाच ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.


आज राजीव सातव हयात असते तर प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश तर दूरच पण त्या राजकारणात असत्या का? हा प्रश्न. राजीव सातव यांना काँग्रेसने कुठेच कमी केले नाही. राजीव सातवांचा सन्मान काँग्रेसमध्ये कसा आहे याची जाणीव काँग्रेसमधील अनेकजणांना होती. राहुल गांधी यांच्यासोबत सावलीप्रमाणे राजीव सातव होते. राहुल गांधी आणि राजीव सातव यांची गोळजोडी म्हटले तर वावगे ठरणार नाही. राजीव सातव यांच्यानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना आधार दिला. विधान परिषदेवर संधी दिली. त्यांचा कार्यकाळ संपला की, काँग्रेस पक्षात अनेक दावेदार विधान परिषदेसाठी इच्छुक असताना, सोनिया गांधी यांनी त्यांना पुन्हा सर्व पक्षांतील विरोध डावलून विधान परिषदेवर संधी दिली. आजही सातव परिवाराचा शब्द काँग्रेस किंबहुना गांधी परिवार डावलत नसतात, अचानक प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसचा हात सोडण्याचा घेतलेला निर्णय त्यांना तरी कितपत पटत असेल? हा प्रश्न. राजकारण फक्त सत्तेसाठी आहे की, विचार पक्षनिष्ठा हे सुद्धा राजकारण आहे हे सध्या कळणे कठीण झाले आहे. पक्ष , त्याची विचारधारा, पक्षनिष्ठा या बाबी आता लोप पावत आहेत हे गेल्या दशकभरातील राजकीय उलथापालथीवरून लक्षात येते. राजकारणात चढ उतार येतात कोणीही सत्तेचा अमरपटट्टा घेऊन येत नसतो. याची जाणीव आणि भान उरले राहिले आहे काय? या प्रश्नाचे उत्तर दलबदलू नेत्यांच्या प्रसंगांतून लक्षात येते. तर काँग्रेस पक्षाने नेते निर्माण करून चूक केली म्हणावी लागेल. काँग्रेस पक्षाने काय नाही केले!


शासनाने तलाठ्यांना स्मार्ट करण्यासाठी इंटरनेट, लॅपटॉप यांसारखी उपकरणे दिली होती, पण त्यांची देखभाल आणि अद्ययावत करणे विसरले. या आंदोलनाने महसूल विभागाला जागा झाली असून, तातडीने उपकरणे पुरवठा करून नागरिकसेवा सुरळीत करण्याची गरज आहे. तलाठी आंदोलनाचा पुढील टप्पा काय, याबाबत संघटना सतर्क आहे. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनांवर ग्राम महसूल संघटनेचे पदाधिकारी मंडळ अधिकारी बागुल, कुलकर्णी(विटेकर),सोडगिर, ग्राम महसूल अधिकारी, रामप्रसाद कोल्हे,ए.एम.चव्हाण, एच.एस.सय्यद,राहुल सानप, विजय भदर्गे, राजु नरोटे, अदनान अन्सारी,ए.व्ही.पाते, श्रीनिवास तायनाक, समीउर रहमान कुरेशी,एम.टी.चव्हाण, अस्मिता जाधव,जी.एस.घाडगे,संदीप बडगुजर,इत्यादी ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत