Home राजकीय अखेर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सापडला मुहूर्त! जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका झाल्या जाहीर

अखेर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सापडला मुहूर्त! जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका झाल्या जाहीर

अखेर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सापडला मुहूर्त! जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका झाल्या जाहीर

अखेर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सापडला मुहूर्त! जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका झाल्या जाहीर

 

मुंबई: अनेक वर्षे रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत या बहुप्रतिक्षित निवडणुकांची घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेली नसलेल्या १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार असून, यात सुमारे ५.२५ लाख मतदार सहभागी होणार आहेत.

 

अनेक वर्षांची प्रक्रिया अखेर पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या होत्या. आरक्षण सूत्रावलीबाबत विविध खटल्यांमुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले, की ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नसलेल्या जिल्ह्यांमध्येच पहिल्या टप्प्यात निवडणुका घ्या. त्यानुसार राज्यातील केवळ १२ जिल्हा परिषद आणि त्यांच्याशी संबंधित १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीतून ७३१ जिल्हा परिषद सदस्य आणि १४६२पंचायत समिती सदस्य निवडून येतील, ज्यात मागास प्रवर्गासाठी १९१ जागा राखीव आहेत.

 

पहिल्या टप्प्यातील जिल्हे आणि भूगोल

पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या एकूण १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. १३ जानेवारीपासून प्रक्रिया सुरू होत असून, यात ग्रामीण भागातील विकासकामांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या संस्थांचे नियोजन होईल.

 

निवडणूक वेळापत्रक: सविस्तर मार्गदर्शन

राज्य निवडणूक आयोगाने झेडपी पंचायत समिती निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार:

:-१ जुलै २०२५ची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल.

:-अर्ज दाखल करणे:१६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६ (ऑफलाइन प्रक्रिया).

:-अर्ज छाननी:२२ जानेवारी २०२६.

:-अर्ज माघार:२७ जानेवारी २०२६ दुपारी ३ वाजेपर्यंत.

:-अंतिम उमेदवारी यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप:२७ जानेवारी दुपारी ३ नंतर.

:-मतदान ५ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३०).

:-मतमोजणी आणि निकाल:७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी १० वाजता सुरुवात)

या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मते देण्याचा अधिकार आहे – एक जिल्हा परिषदेसाठी आणि दुसरे पंचायत समितीसाठी.ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिलांना आणि लहान मुलांसह असलेल्या महिलांना मतदान केंद्रावर प्राधान्य मिळेल.

 

राजकीय वातावरण आणि अपेक्षा 

या घोषणेमुळे ग्रामीण राजकारणात ढवळून निघालेला धुरळा पुन्हा उडण्यास तयार आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नेते आता उमेदवारीसाठी धावपळ सुरू करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला १५ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांच्या निवडणुका होणार आहेत.निवडणूक खर्च मर्यादाही आयोगाने निश्चित केल्या असून, जिल्हा परिषदेसाठी ९ लाखांपर्यंत आणि पंचायत समितीसाठी ६ लाखांपर्यंत मर्यादा आहे.ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उमेदवारांनी आता तयारीला वेग द्यावा आणि मतदारांनी जबाबदारीने मतदान करावे, असे आवाहन आयुक्त वाघमारे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here