Home सामाजिक आशिया खंडात सर्वप्रथम शिक्षणाचा अधिकार सांगणारा महात्मा फुले यांचा विचार महाराष्ट्रात रुजतो आहे का?

आशिया खंडात सर्वप्रथम शिक्षणाचा अधिकार सांगणारा महात्मा फुले यांचा विचार महाराष्ट्रात रुजतो आहे का?

आशिया खंडात सर्वप्रथम शिक्षणाचा अधिकार सांगणारा महात्मा फुले यांचा विचार महाराष्ट्रात रुजतो आहे का?

शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण मोफत केले. मात्र, महात्मा फुले यांनी भारतात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले.आशिया खंडात सर्वप्रथम मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा विचार मांडणारे पहिले शिक्षणतज्ज्ञ महात्मा फुले आहेत. महात्मा ज्योतीराव फुले यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्ताने केलेला लेखप्रपंच.शिक्षण हे सर्व विकासाचा पाया आहे. त्याशिवाय मानवी विकास अशक्य आहे.त्यामुळे मागासवर्गीयांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा विकास व्हावा यासाठी त्यांनी सर्वप्रथम शिक्षण हे प्रत्येक नागरिकाला मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला शिक्षित केले आणि शिक्षणाची ही गंगा सर्व समाजातील घटकांपर्यंत पोहोचवली.त्यांनी देशाला पहिली महिला लेखिका आणि मुख्याध्यापिका केली.त्यांच शैक्षणिक योगदान आजच्या एकविसाव्या शतकातही मार्गदर्शन करीत आहे.त्यांच्याच मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची संकल्पना राज्यकर्त्यांनी घेतली आहे.त्यामुळेच शिक्षण हक्क कायदा हा सर्वांना प्राथमिक शिक्षण मोफत देत आहे.कोत्याही योजनांची संकल्पना महत्वाची आहे.ती संकल्पना सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडली. खर तर सनातनी विचारांच्या लोकांना न जुमानता त्यांनी सर्वांना शिक्षण दिले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान ३९५ कलमाचे का लिहले? ३९४ किंवा ३९६ कलमाचे का लिहले नाही? तर त्याला कारण महात्मा फुले यांच्या विचारांचे म्हणता येईल. महात्मा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षण ज्या पुण्यातील भिडे वाडयातून दिले, पहिली शाळा सुरू केली. त्या शाळेचा क्रमांक ३९५ होता. त्यांची व आपल्या गुरूविषयी कृतज्ञता म्हणून संविधान ३९५ कलमाचे लिहले.महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्वाचे किती महत्वाचे स्थान दिले हे लक्षात येते. आज महात्मा फुले यांच्या विचारांचा शिक्षणात किती समावेश आहे? शिक्षण हे गरिबाच राहिलं आहे का? दिवसेंदिवस शिक्षणाच्या खर्चात वाढ होत आहे.त्यामुळे आपोआपच गरिब शिक्षणापासून वंचित राहणार आहे.उच्च शिक्षणाबद्दल सरकार थोडा जरी विचार करते का?उच्च शिक्षण इतके महागडं झालं आहे की, ते गरीबांना शक्य नाही.त्यामुळे आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मोफत शिक्षणाचा वसा उच्च शिक्षण बहुजन मोफत करून करू शकतो.आज मागासवर्गीयांना मिळणारी शिष्यवृत्ती ही शिक्षणाचा खर्च भावते का हा प्रश्न.
भारत हा खेड्यांचा देश आहे.त्यामुळे इथं गावं,वस्ती, तांडे,वाडी आदिंची संख्या जास्त आहे.त्यामुळे शाळेतील पटसंख्या कमी असणं साहजिकच असणार आहे. मग, असा तुघलकी निर्णय निदान राज्यात अपेक्षित नाही. खरं तर शिक्षणाची कवाडं तांड्यावर आणि वाडी वस्तीवर उघडायला हवीत.महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटल्याप्रमाणे प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत दिल गेलं पाहिजे.आशिया खंडात सर्वप्रथम शिक्षणाचा अधिकार सांगणारा महात्मा फुले यांचा विचार महाराष्ट्रात रुजतो आहे का? असा प्रश्न पडतो. १९ व्या शतकामध्ये शिक्षण क्रांती ही साधी गोष्ट नव्हती.कारण, त्यावेळी धर्माचा, अनिष्ट रूढी परंपरा यांचा समाजावर प्रभाव होता.त्यावेळी धर्माच्या ठेकेदारांनी मानसाला गुलाम बनवून वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर ठेवले.आजही तिचं परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न एकप्रकारे केला जात आहे.राज्य सरकार राज्याच्या अर्थसंकल्पात शिक्षणावर आवश्यक तेवढी तरतूद करते का?हा प्रश्न पडला पाहिजे.यापेक्षा धार्मिक स्थळांच्या विकासासाठी वारेमाप निधीची तरतूद केली जाते.मानवाच्या आवश्यक बाबींवर अधिक निधी दिला पाहिजे.अनावश्यक रिकामा भ्रष्टाचार करण्याकरिता इतरत्र निधी अधिक दिला जातो. ज्यामुळे मर्जीतील नेत्यांना याचा लाभ होईल.

विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥
निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।
वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥

एकोणिसाव्या शतकात महात्मा ज्योतिबा फुले यांना शिक्षणाचे महत्त्व कळले आज तर २१ वे शतक आहे.असो,
आज २८ नोव्हेंबर, १८९० शिक्षणतज्ज्ञ महात्मा फुले यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

– पदमाकर उखळीकर,
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)
मो.९९७५१८८९१२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here