Home राजकीय सामाजिक न्याय, लोकशाही आणि बीड जिल्ह्याच आश्वासक नेतृत्व!

सामाजिक न्याय, लोकशाही आणि बीड जिल्ह्याच आश्वासक नेतृत्व!

सामाजिक न्याय, लोकशाही आणि बीड जिल्ह्याच आश्वासक नेतृत्व!

नगराध्यक्ष हे नगरपालिका किंवा नगरपरिषदेचे प्रमुख असतात, नगराध्यक्ष हे नगरपालिकेचे दैनंदिन प्रशासन चालवण्यासाठी मदत करतात. नगराध्यक्ष वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि भूमिका पार पाडतात.प्रशासकीय प्रमुख म्हणून नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजाचे आणि प्रशासनाचे नेतृत्व करतात. नगरपालिकेच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवतात आणि निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात.स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व हा नगराध्यक्ष करत असतो.आपल्या शहरातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात आणि शहराच्या विकासासाठी काम करतात.एक चांगला नगराध्यक्ष असा असावा जो दूरदृष्टी असलेला, लोकाभिमुख, प्रामाणिक, पारदर्शक आणि सक्षम नेतृत्व देणारा असावा. त्याला शहरातील समस्यांची जाणीव असावी आणि त्यावर प्रभावीपणे तोडगा काढण्यासाठी नियोजन करता यावे.सकारात्मक गुण असणे आवश्यक आहे.तोच नगराध्यक्ष शहराचा सर्वांगीण विकास करू शकतो.

दूरदृष्टी: शहराच्या भविष्याचा विचार करून विकास योजना तयार करणारा असावा. लोकाभिमुख: जनतेच्या गरजा आणि समस्या समजून घेणारा आणि त्यांना प्राधान्य देणारा असावा. प्रभावी संवाद: जनतेशी आणि नगरपालिकेच्या सदस्यांशी स्पष्ट आणि प्रभावी संवाद साधणारा असावा.सक्षम नेतृत्व: निर्णय घेण्यास सक्षम असावा आणि आपल्या टीमला एकत्र घेऊन काम करणारा असावा.पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा: सर्व कामे पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे करणारा असावा.

जबाबदारी: शहराच्या विकासाची आणि लोकांच्या कल्याणाची जबाबदारी स्वीकारणारा असावा. नियोजन कौशल्य: समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी चांगले नियोजन करता येणे आवश्यक आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या मते, नेतृत्वाची सुरुवात सेवेच्या भावनेतून होते, ज्यात साधेपणा, आत्म-शिस्त आणि सचोटी असणे आवश्यक आहे. खरा नेता म्हणून लोकांना अहिंसक मार्गाने प्रेरित करून, त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य, न्याय आणि समानतेची मूल्ये जागृत करून एक परिवर्तन घडवण्याची क्षमता असायला हवी.

थोडक्यात, एक चांगला नगराध्यक्ष हा केवळ एक नेता नसून, तो शहरातील लोकांचा विश्वासू प्रतिनिधी आणि विकासकामांचा आधारस्तंभ असावा. नगराध्यक्ष कसा असावा याची प्रचिती बीडकरांना देतील तो आश्वासक आणि सर्वसमावेशक चेहरा म्हणजे पप्पू कागदे.सामाजिक न्याय ,लोकशाही आणि एक आश्वासक चेहरा म्हणून पप्पू कागदे बीडकरांना विकसनशील नव्हे तर विकसित चेहरा म्हणून बीडचा विकास करतील यात दुमत नाही. कारण त्यांनी एखादे सामाजिक कार्य हाती घेतले तर ते कार्य ते तडीस नेऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देतात याचा अनुभव बीडकरांना आला आहे. गायरान धारकांच्या प्रश्नावर त्यांनी राज्य व केंद्र सरकार दखल घेईल असे आंदोलने करून गायरान जमीन मिळवून दिली आहे तसेच राज्यात महिलांवर किंवा सर्वसामान्यांवर जिथे कुठे अत्याचार होतो त्या अत्याचाराविरोधात सरकारला आंदोलनाच्या माध्यमातून वेळोवेळी जाब विचारला आहे. हे सुद्धा बिडकरांनी आणि संबंध राज्याने पाहिले आहे. त्यांची धमक, प्रमाणिकरण आणि सक्रियता ही त्यांची जमेची बाजू राहिली आहे.बीड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असून , नगराध्यक्ष पदासाठी पप्पू कागदे यांच्या माध्यमातून शहराला विकास करण्याची नवी संधी मिळाली आहे ती संधी मतदारांनी दवडू नये. पप्पू कागदे यांचा जनसंपर्क सर्व पक्षीय मैत्री तसेच राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेतील सरकारमधील सत्तेतील कोणतेही पद नसताना, एक विश्वासू चेहरा म्हणून ओळखले जातात.

बीडकरांना आपला हक्काचा माणूस म्हणून पप्पू कागदे यांच्याकडे पाहिले जाते. विकासाची नेमकी दृष्टी कशी असावी. सर्वसामान्यांचे बांधिलकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणून पप्पू कागदे यांच्याकडे पाहता येईल. त्यामुळे आगामी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नगर परिषद निवडणुकीत परळीचा नगराध्यक्ष म्हणून पप्पू कागदे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी सर्वसामान्यांना लाभ मिळावा यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. गेल्या कित्येक वर्षापासून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्र किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरही आहे . त्यामुळे बीडच्या विकासाबाबत निश्चित असे म्हटले तर योग्य. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांच्याशी एकनिष्ठ राहून , यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजपयोगी कार्यक्रम पप्पू कागदे यांनी राबविले आहेत .

एक सामाजिक भान कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आहेत. आज शहरातील प्रत्येक वार्ड आणि गल्लीबोळात त्यांच्या नावाची नगराध्यक्ष म्हणून चर्चा होत आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांना पसंती असल्याचे नागरिक सांगत आहेत. खरंतर बीडकरांना ही चालून संधी चालून आली आहे त्याचा योग्य तो उपयोग बीडकरांनी करावा ही अपेक्षा.

 

 

– पदमाकर मुजमुले,  (लेखक पीएम फाऊंडेशनचे अध्यक्ष असून मुक्त पत्रकार आहेत.) मो.९९७५१८८९१२.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here