Home देश-विदेश भारतीय संविधान देशातील प्रत्येक धर्मियांचे संरक्षण करते – रानबा गायकवाड  मिल्लीया विद्यालयात संविधान दिन साजरा 

भारतीय संविधान देशातील प्रत्येक धर्मियांचे संरक्षण करते – रानबा गायकवाड  मिल्लीया विद्यालयात संविधान दिन साजरा 

भारतीय संविधान देशातील प्रत्येक धर्मियांचे संरक्षण करते – रानबा गायकवाड      मिल्लीया विद्यालयात संविधान दिन साजरा 

परळी(प्रतिनिधी)जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे संविधान हे या देशातील प्रत्येक धर्मियांचे संरक्षण करते व सर्वांना समान संधी व न्याय देते असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले.ते 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या निमित्ताने शहरातील मिल्लीया प्राथमिक व माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानप्रसंगी बोलत होते.

26 नोव्हेंबर संविधान गौरव दिनानिमित्त परळी वैजनाथ येथील मिल्लीया प्राथमिक व माध्यमिक शाळेत भव्य संविधान दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सय्यद अब्दुल गणी जवाद अली हे होते. तर प्रमुख व्याख्याते म्हणून जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड हे होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन केले.

पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाले की, हजारो जाती आणि अनेक धर्म असलेल्या भारतासाठी सर्व देशवासियांना समान संधी व समान न्याय, हक्क व अधिकार देणारी राज्यघटना लिहण्याचे कठीण काम होते.हे कठीण कार्य प्रज्ञावंत व जगातील महान विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिलया पेलले. जगातील सर्वोत्तम असे संविधान देशाला दिले.प्रत्येक व्यक्तीला एक मत,एक मुल्य हा सर्वात मोठा अनमोल असा दागिना बाबासाहेबांनी दिलेला आहे.बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली असेही ते म्हणाले.यावेळी मुख्याध्यापक सय्यद अब्दुल गणी यांनीही संविधानावर आपले विचार मांडले. व विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांनी जे हक्क आणि अधिकार दिले आहेत त्याचे संरक्षण केले पाहिजे असे सांगितले. गेल्या वर्षी बीड जिल्ह्यात घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा , सुंदर शाळा या अभियानात मिल्लीया प्राथमिक व माध्यमिक शाळेने प्रथम क्रमांकाचे दोन लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले होते. त्याचाही याप्रसंगी मुख्याध्यापक गणी यांनी अभिमानाने उल्लेख केला.

कार्यक्रमापूर्वी शाळेच्या विद्यार्थ्यांनी परिसरात भव्य संविधान गौरव प्रभात फेरी काढली . तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व सांगणारे उत्कृष्ट असे चित्र, संविधान गीते, संविधानावर आधारित नाटिका, पथनाट्य ,प्रश्न – उत्तर, ,असे विविध उत्कृष्ट सादरीकरण विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमास सय्यद अझहर सिकंदर सय्यद अजहर अहमद, शेख खमरोद्दीन,श्रीमती सय्यदा निशात, शेख मेहराज, पठाण मोईज खान, मोहम्मद कलीमैद्दीन, श्रीमती शेख दस्तगीरजहा, शेख अयाज अहमद, श्रीमती निखत फातेमा, श्रीमती अन्सारी परवीन, सय्यद हम्मीद्दीन, सय्यद वहाज, शेख अब्दुल अजीज, शेख सादिक, शेख आखिब जावेद, अब्दुल हासिब, सय्यद मुस्दीख यांच्यासह विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here