परभणी(प्रतिनिधी)पाथरी शहरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या सलग घरफोडी गुन्ह्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गौतमनगर, ओमकारनगर आणि विठ्ठलनगरसह विविध भागांत घडलेल्या या घटनांमुळे पोलिसांना सतर्क केले होते. मात्र, स्थानिक गुन्हा शाखेने केलेल्या सखोल तपासात हे गुन्हे उघड झाले असून, एका विधीसंघर्षग्रस्त बालकने या सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. या कारवाईतून रोख रक्कम आणि सोने-चांदीचे दागिने असा सुमारे ५ लाख ६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पाथरी शहरात अलीकडे घरफोडीचे गुन्हे वाढले होते. गौतमनगर येथे १२ डिसेंबरला दुपारी चार वाजता घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजा तोडून २ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज लंपासला होता. त्याचप्रमाणे विठ्ठलनगरात १७ डिसेंबरला झालेल्या घरफोडीत २ लाख ७७ हजार १०० रुपयांचा माल गायब झाला होता. माळीवाडा भागातही भरदिवसा १५ लाखांचे दागिने आणि १ लाख रोख रक्कम असा १६ लाखांचा फक्त उघडकीस आला होता. या गुन्ह्यांमुळे शहरवासीयांमध्ये अस्वस्थता वाढली होती. पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी तात्काळ स्थानिक गुन्हा शाखेला विशेष तपासाचे आदेश दिले.

या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेने गुप्त माहितीच्या आधारावर सागर कॉलनी येथील एका विधीसंघर्षग्रस्त बालकचा शोध घेतला. पालकांच्या उपस्थितीत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर या बालकाने ओमकारनगर, गौतमनगर आणि विठ्ठलनगर येथील घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली. चौकशीदरम्यान बालकाकडून १ लाख ६३ हजार रुपयांची रोख रक्कम आणि अंदाजे ५ लाख ६ हजार ७५० रुपयांचे सोने व चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. हे मुद्देमाल चोरीला गेलेल्या घरांमधूनच सापडला असल्याने पोलिसांना मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान, कायद्यानुसार विधीसंघर्षग्रस्त बालकला पालकांच्या ताब्यात सोडण्यात आले असून, पोलिस कारवाई सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात पार पडली. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलिस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार यांच्याबरोबरच पोलिस अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, विलास सातपुते, पांडुरंग तुपसुंदर, माणिक डुकरे, मुकेश बुधवंत, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण, उत्तम हनवते, इमरान खान आणि गजानान क्षीरसागर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
पाथरी तालुक्यातील उमरा गावीही नुकतीच ९७ हजार २०० रुपयांचे सोने लंपासले गेले असून, अशा गुन्ह्यांवर पोलिसांनी आता विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या कारवाईमुळे पाथरी पोलिसांची कर्तबगिरकी अधोरेखित झाली असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा गुन्ह्यांविरुद्ध सतर्कता बरोबरीने तपास सुरू असून, नागरिकांनीही घरटे सांभाळण्याचे आवाहन केले आहे. परभणी जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस विभाग सतत प्रयत्नशील आहे.DOC-20251229-WA0013.