Home महाराष्ट्र काँग्रेस पक्षाने काय नाही केले! 

काँग्रेस पक्षाने काय नाही केले! 

काँग्रेस पक्षाने काय नाही केले! 

 

महाराष्ट्रातील काही मोजक्या किंवा बोटावर मोजता येतील इतक्या नेत्यांचे थेट सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधता येईल असे विश्वासाचे नाते होते. जे की, थेट सोनिया गांधी यांना बोलू शकतील त्यांना कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही. त्यातील अनेक जणांनी काँग्रेसचा हात सोडला आणि हाताता कमळ घेतले. मात्र काळाच्या शीर्षस्थानी असलेल्या नेत्याला ते आता किती थेट बोलू किंवा संपर्क करू शकतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कार्यकर्त्यांना नेता बनवणारी काँग्रेस आणि सध्या याच नेत्यांना पळवणारी भाजप सत्तेत असल्याने अनेकांना सत्तेची ऊब हवीहवीशी वाटते आहे. भलेही त्यांचा सन्मान तेथे असो वा नसो याची प्रचिती खूद्द नाना पटोले भाजपमध्ये असताना त्यांनी अनुभवली आहे. असो, मात्र भाजपला आयते नेते मिळाल्याने त्यांचे लाभार्थी कार्यकर्ते आपोआपच भाजपशी जुडले जात आहेत.पण नवीन नेतृत्व भाजपमध्ये किती निर्माण झाले? याचे उत्तर भाजपमधील नेते देतील? प्रश्न काँग्रेसचा उदोउदो करण्याचा नव्हे तर काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांचा ऊहापोह. जे कधी काळी काँग्रेस पक्षात कार्यकर्ते म्हणून काँग्रेसचा हात पकडण्याचा प्रयत्न करत होते . मात्र काँग्रेसने ज्यावेळी हातात हात घट्ट पकडला आणि त्यांना विविध पक्षातील व घटनात्मक पदे दिली. मात्र, काँग्रेस सत्तेतून घसरण्यास सुरुवात झाली की, त्याचं नेत्यांनी काँग्रेसचा हात हळूहळू निसटला सुरुवात झाली आणि जे नेते थेट गांधी परिवाराशी संवाद साधू शकत होते त्या नेत्यांनी सुध्दा काँग्रेसला धक्का दिला आणि भाजपचे कमळ हाती घेतले. मराठवाड्यातील दिग्गज नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री स्व.विलासराव देशमुख, माजी अशोक चव्हाण,स्व.राजीव सातव हे गांधी परिवाराशी थेट संवाद साधू शकणाऱ्या नेत्यांमध्ये, मराठवाड्याला त्यांचा अभिमान होता. कुठल्याही पक्षातील नेत्यांना या तिघांचा हेवा वाटायचा.स्व.राजीव सातव तर गांधी परिवाराच्या थेट किचन पर्यंत जाणारे नेते आज त्यांच्या पत्नी त्यांच्या पश्चात भाजपचे कमळ हाती घेत आहेत. आज राजीव सातव हयात असते तर प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश तर दूरच पण त्या राजकारणात असत्या का? हा प्रश्न. राजीव सातव यांना काँग्रेसने कुठेच कमी केले नाही. राजीव सातवांचा सन्मान काँग्रेसमध्ये कसा आहे याची जाणीव काँग्रेसमधील अनेकजणांना होती. राहुल गांधी यांच्यासोबत सावलीप्रमाणे राजीव सातव होते. राहुल गांधी आणि राजीव सातव यांची गोळजोडी म्हटले तर वावगे ठरणार नाही. राजीव सातव यांच्यानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना आधार दिला. विधान परिषदेवर संधी दिली. त्यांचा कार्यकाळ संपला की, काँग्रेस पक्षात अनेक दावेदार विधान परिषदेसाठी इच्छुक असताना, सोनिया गांधी यांनी त्यांना पुन्हा सर्व पक्षांतील विरोध डावलून विधान परिषदेवर संधी दिली. आजही सातव परिवाराचा शब्द काँग्रेस किंबहुना गांधी परिवार डावलत नसतात, अचानक प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसचा हात सोडण्याचा घेतलेला निर्णय त्यांना तरी कितपत पटत असेल? हा प्रश्न. राजकारण फक्त सत्तेसाठी आहे की, विचार पक्षनिष्ठा हे सुद्धा राजकारण आहे हे सध्या कळणे कठीण झाले आहे. पक्ष , त्याची विचारधारा, पक्षनिष्ठा या बाबी आता लोप पावत आहेत हे गेल्या दशकभरातील राजकीय उलथापालथीवरून लक्षात येते. राजकारणात चढ उतार येतात कोणीही सत्तेचा अमरपटट्टा घेऊन येत नसतो. याची जाणीव आणि भान उरले राहिले आहे काय? या प्रश्नाचे उत्तर दलबदलू नेत्यांच्या प्रसंगांतून लक्षात येते. तर काँग्रेस पक्षाने नेते निर्माण करून चूक केली म्हणावी लागेल. काँग्रेस पक्षाने काय नाही केले!

 

– पदमाकर उखळीकर,

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

मो. ९६३७६७९५४२.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here